लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे, प्रत्येक सेकंदाला-मिनीटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या १ लाख २५ हजार मुंबईकरांचे हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या स्कीम मध्ये कायमचे गेलेयत. मुंबईतल्या ३१ वर्षीय प्रदीप वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख या टोरेस स्कॅममध्ये गमावले आहेत.
एकदम श्रीमंत सॉफिस्टिकेटेड नाव दिलं..
-जागोजागी, चकचकीत भुरळ पाडणारे ऑफिस उघडले
-असामान्य वाटावं असं कंपनीचं नाव ठेवलं
-चकचकीत, मोठा बिजनेस भासावा अशी वेबसाईट
-एकदम मोठ्या उद्योगाचा आपण भाग होतोय हे पटवून दिलं
- कंपनीत विश्वास बसावा म्हणून अनेक विदेशी चेहरे
-सोने, हिरे, चांदीत गुंतवणूक करत असल्याचं भासवलं
-गुंतवणूकीवर दर आठवड्याला परताव्याचं आमिष दिलं.
- ६ लाखांच्या गुंतवणूकीवर आठवड्याभरात ६ टक्के व्याज
- ६ लाखाहून अधिक गुंतवणूकीवर ११ टक्के व्याज
- म्हणजे वर्षाला ५२० टक्के. एका लाखाचे ६ लाख
- एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या (लॅब निर्मीत हिरे) पेंडंटवर 10 हजार रुपयांची सूट दिल्याचं दाखवलं.
- तसेच ज्वेलरीच्या गुंतवणुकीवर देखील 6 टक्क्यांचा परताव्याचं आमिष दिलं
- सुरुवातीला काही जणांनी पैसे गुंतवले, आठवड्याला परतावा यायला लागला. पैसे येतायत हे दिसल्यावर सगळे आपल्या नातेवाईक, मित्रांनाही पैसे टाकायला सांगू लागले.यातूनच मुंबईत जागोजागी टोरेसची चैन उभी राह्यली.
कंपनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेले खडे, ज्वेलरी डिस्काउंटमध्ये द्यायची. गुंतवणूक केलेल्या या ज्वेलरीच्या रकमेवर आठवड्याला परतावा मिळायचा. ही ज्वेलरी, खडे परदेशी आहेत, असं कंपनी सांगायचीहळू हळू आठवड्याला ६ टक्क्यांऐवजी ११ टक्के परतावा कंपनी द्यायला लागलीमग लोभापायी सामान्य माणसं आणखी पैसे टाकायला लागली. अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती.
ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा द्यायची. मग कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला . त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. म्हणून अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले.
हेच बघून वर उल्लेख केलेल्या प्रदीप कुमार वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख गुंतवले. आपल्या नातेवाईक मित्रमंडळीसह ३८ लोकांचे पैसेही त्याने यात गुंतवले.मिळालेला परतावा परत टोरेस कंपनीकडे सगळे गुंतवत होते कारण एकच ते म्हणजे आणखी लोभ, हव्यास, ग्रीड, मोह...
शेवटी याचा शेवट व्हायचा तोच झाला... एक सकाळ उजाडली आणि कंपनीने फसवणूक केल्याचं लक्षात आलं.. कंपनीने दिलेले दागिने पण नकली असल्याचं कळलं. कोट्यधीश होण्याची स्वप्न बघणारे एका रात्रीत देशोधडीला लागले.
लोकलचे धक्के खात, कपडे पिळावे इतका घाम गाळून कमवलेला पैसा मुंबईकरांनी सानपाडा, दादर,भाईंदर अश्या विविध भागातल्या ब्रांचमध्ये जात गुंतवला... कोणी घर गहाण ठेवलं, कोणी विकलं, कोणी कर्ज काढलं, कोणी पैसे उधार घेतले, कोणी दागिने विकले. श्रीमंत होण्याची स्वप्न बघत, कोणी हक्काच्या घराचं स्वप्न बघत, कोणी कर्जमुक्त होण्याचं स्वप्न बघत टोरेसमध्ये पैसे गुंतवले.. आणि आता ही स्वप्न पुर्ण होणं तर दुरच पण अनेकांची झोप सुद्धा एका चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतलीये. गरिबीच्या खाईत लोटलंय. होतं नव्हतं सगळं गेलंय....
कंपनीचा मालक युक्रेनला पळून गेलाय. यातून एक रुपया सुद्धा रिकव्हर होईल असं वाटत नाही.
बाबांनो आतातरी शहाणे व्हा. घरबसल्या झटपट पैसा मिळत नसतो. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवण्याईतकच तो सावधपणे जपणं देखील आवश्यक असतं. नाहीतर प्रत्येकवेळी श्रीमंतीची स्वप्न दाखवत तुम्हाला नागडं करायला आणखी एक स्कॅम येईल.
Post a Comment
0Comments